सामाजिक

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिवाळीच्या वस्त्र व अन्नधान्याची भेट…

"दिवाळीनिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरात अंधार होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी साईनाथ महाराज पोहोचवत आहेत अन्नधान्य...!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

श्रीक्षेत्र माहूर

दिवाळीच्या दिवशी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या घरी दिवाळी साजव्बी व्हावी या उद्त्त हेतूने माहूर येथील साईनात महाराज यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना वस्त्र व अन्नधान्याचे वाटप करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे…

 

 

 

हा उपक्रम राबवताना माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील ‘त्या’ आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या कुटुंबप्रमुखाने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. सदरील दु:खद घटनेमुळे परिवारासह गावावर शोक कळा पसरली होती. घटना कळतात माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधीश राष्ट्रसंत तथा राज्याचे स्वच्छता दूत ब्रँड अँबेसिडर साईनाथ महाराज वसमतकर यांनी दि. 21 रोजी दिवाळीच्या दिवशी मौजे पाचुंदा येथे जाऊन त्या आत्महत्याग्रस्त परिवाराला वस्त्र अन्नधान्याची किट दिली….

 

 

तालुक्यातील अति दुर्गम भागात असलेल्या मौजे पाचुंदा येथील एका शेतक-याने कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना साईनाथ महाराज वसमतकर यांना ही बाब कळल्याने त्यांनी तात्काळ माहूरमौजे पाचुंदा गाठून पाटील परिवाराच्या सदस्यांना वस्त्र आणि अन्नधान्य देऊन धीर दिला….

 

 

यावेळी साईनाथ महाराज वसमतकर यांनी सांगितले की दुःखी, कष्टी,रोगी, अनाथ व अपंग निराधार यांची सेवा करावी. त्या सेवेतूनच परमेश्वराचे दर्शन होऊन संसार सुखी होइल असे सांगितले दिवाळीच्या दिवशीच साईनाथ महाराजांनी गावात भेट देऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबाला धीर दिल्याने गावकऱ्यांनी महाराजांचा हृदय सन्मान केला. यावेळी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीसह आई,मुले , भाऊ, तसेच अनेक गावक-यांसह मान्यवर व पत्रकार उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close