सामाजिक

पडसा येथील बंद केलेला “तो” रस्ता खुला करा ; न्यायालयाचे माहूर तहसीलदारांंना आदेश…

'घटनास्थळावरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याचे सिंदखेड पोलीसांनाही निर्देश....!'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

किनवट/माहूर

    संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधलेल्या पडसा येथील ‘त्या’ प्रकरणात रस्ता खुला करून रस्ता पुर्ववत करण्याचे आदेश न्यायालयाने माहूर तहसिलदारांना दिले असून घटनास्थळावरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सिंदखेड पोलीसांनी सांभाळण्यासंबंधीचे आदेश देखील नांदेड न्यायालयाने दिले असल्याने बहुचर्चित प्रकरणातील नाट्यमय घडामोडींवर संपुर्ण तालुक्यात चवीने चर्चा होत आहे…..

 

 

माहूर कालुक्यातील मौजे पडसा येथील बहुचर्चित प्रकरणात वैयक्तिक वादातून एका गावपुढा-याकडून वसंता नागोराव भगत यांच्या घराचा रस्ता बंद करण्याचे कटकारस्थान केले होते.. त्यात घराबाहेर पडण्यासाठी वसंता भगत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना चक्क भिंतीवरून उड्या मारून ये-जा करण्याची दुर्दैवी वेळ समाजानेच लादल्याच्या व्यथा त्यांनी न्यायालयासमोर मांडून दिवाणी दावा क्र. आर.सी.एस. 289/2024 यात न्यायालयाचा मनाई हूकूम मिळविला होता.. दरम्यान न्यायव्यवस्थेने भगत यांच्या बाजूनेे मनाई हूकूम पारीत केल्यानंतर दि. २४ जुलै रोजी चिडून गावातील ‘त्या’ स्वयंघोषित पुढा-याने गावातील काही महिला व पुरूषांना हाताशी धरून न्यायालयाचा स्थगिती आदेश न जुमानता बळजबरीने वसंता भगत यांच्या घराबाहेर पडण्याच्या मार्गात भिंतीचे बांधकाम करून न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केली होती. त्यावर एकीकडे अवमान याचिका दाखल केली असतानाच दि. २४ जुलै रोजी वादीचा घराबाहेर पडण्याचा बंद करण्यात आलेला रस्ता खुला करून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश नांदेड न्यायालयाने माहूर तहसिलदारांना दि. २२ ऑगस्ट रोजी दिले असून घटना स्थळावर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सिंदखेड पोलीसांनाही आदेशित करण्यात आले आहे. एकंदरीतच मागील अनेक महिण्यापासून सुरू असलेले हे प्रकरण संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेत असून गावपातळीवरच्या गलिच्छ राजकारणाचे ज्वलंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे..

 

 

“विशेष म्हणजे जवळपास सर्वच राजकीय पक्षात सद्यस्थितीत हुजरेगीरी करणारे तालुक्यातील समाजातील नेते व केवळ वॉट्सअप व फेसबुक वरून समाज सुधारण्यासाठी मोठमोठी भाषणे झाडणारी स्वयंघोषित समाजसुधारक मंडळी या प्रकरणाची कल्पना असून देखील अज्ञातवासात राहणे पसंत करीत आहेत. वादी व प्रतिवादी दोन्ही बाजू एकाच समाजातील असल्याने चर्चेतून मार्ग निघण्याची शंभर टक्के हमी असतानाही समाजाकडूूूूनच समाजावर होत असलेल्या या प्रकरणात समाजातील  ‘पोपटपंछी ‘ पुढा-यांसह राजकीय मंडळी मात्र दूर पळण्यातच धन्यता मानत असल्याने या संधीसाधू पुढा-यांचे राजकारण केवळ मतांपुरतेच का..? असा सवालही यानिमित्ताने सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close