ईतरनोकरी संदर्भ

वनविभागाच्या कामचलाऊ धोरणामुळे दहेली येथे विहिरीत पडलेल्या दोन अस्वलांपैकी एकाचा पाण्यात बूडून मृत्यू…

"मांडवी वनविभागाच्या निष्काळजीपणाचा उच्चांक ; वनप्रेमी मंडळीकडून तीव्र संताप"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

किनवट/माहूर

  वनविभागाच्या कामचलाऊ वृत्तीमुळे दहेली येथे विहिरीत पडलेल्या दोन अस्वलांपैकी एकाचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची खळबळजनक आणि गंभीर माहिती उघडकीस आली असून याप्रकरणी वन्यप्रेमी मंडळीकडून तीव्र संताप व्यक्त करताना या प्रकरणाची सखोल चौकशी होवून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे….

 

 

किनवट तालुक्यातील मौजे दहेली शिवारात पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेले दोन अस्वल येथील आत्माराम कोटरंगे यांच्या शेतातील विहिरीत दि. २१ मार्च च्या रात्री पडले होते. ही घटना शेतक-यांच्या लक्षात आल्यानंतर काल दि. २२ रोजी वनविभागाला या घटनेची माहीती दिल्यानंतर दुपारी उशीरा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी डेरेदाखल झाले… विशेष म्हणजे त्यावेळी दोन्ही अस्वल जिवंत होते… दरम्यान नियोजनशुन्य वनअधिका-यांनी आपल्या कंजूस प्रवृत्तीचा प्रत्यय देताना अत्यंत बारीक जणू ससे धरण्यासाठी वापर करण्यास साजेशा असलेल्या दो-यांच्या साह्याने विहीरीत पडलेल्या अस्वलांना बाहेर काढण्यासाठी लोखंडी पिंजरा विहीरीत सोडला… त्यावेळी एक अस्वल विहीरीच्या कपारीवर जाऊन बसला होता असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणने आहे…

 

दरम्यान अत्यंत बारीक दो-यांच्या साह्याने विहीरीत पिंजरा सोडल्यानंतर दोनपैकी एक अस्वल त्या पिंज-यात जाऊनही बसला होता.. त्याचवेळी विहीरीतील कपारीवर बसलेल्या अस्वलाने पिंज-यावर उडी मारल्याने पिंज-याच्या काही दो-या तुटल्या..तर काही दो-या वनविभागाच्या ‘शक्तीमान’ कर्मचा-यांनी सोडून दिल्याचे वास्तव अवेकांच्या मोबाईल मध्ये कैद झाले आहे. परिणामी पिंज-यात जाऊन बसलेल्या अस्वलासह पिंजरा विहीरीत तळाशी पोहोचल्याने पिंज-यातील अस्वलाचा पाण्यातच मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे… तर दुसरा अस्वल पुन्हा विहीरीतील कपारीवर जाऊन बसल्यानंतर वनविभागाने दुसरा पिंजरा उपलब्ध करून दुस-या अस्वलाला बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्याचेही सांगण्यात येत आहे…

 

घटनेचा गवगवा होवून मांडवीच्या प्रभारी वनपरिक्षेत्र अधिका-यासह इतर वनअधिकारी व कर्मचा-यांना मन:स्ताप होवू नये यासाठी मृत अस्वलावर अत्यंत तातडीने “अग्नीसंस्कार” करण्याचा सोपस्कारही पार पाडला असून त्या अस्वलाच्या मृत्यूस सर्वस्वी वनविभागातील कर्मचारी व अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींसह वन्यप्रेमीकडून केला जात आहे.. त्यामुळे वनविभागातील वरिष्ठ अधिका-यांनी याप्रकरणात तातडीने लक्ष घालून अस्वलाच्या मृत्यूस कारणीभुत असलेल्या दोषी अधिकारी व कर्मचा-यांवर सखोल चौकशीअंती कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे…

“विशेष म्हणजे एकीकडे वन्यप्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे पाण्यासाठी भटकंती करू नयेत व त्या वन्यप्राण्यांना जंगलातच पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासन कोट्यावधींचा खर्च करीत असून याच साठीच्या उपाययोजनेसाठी मांडवी परिक्षेत्रातही भन्नाट खर्च करून कृत्रीम पाणवठे तयार केल्याचे कागदोपत्री अस्तिवात आहेत.. परंतू प्रत्यक्षात मात्र मांडवी वनपरिक्षेत्रात कुठेही वनविभागाकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रीम पाणवठ्यात पाणीच नसल्याचे ज्वलंत वास्तव असून यासाठी करण्यात आलेला व होत असलेला खर्च नेमका कोणत्या मार्गाने गेला.. ? याचाही शोध घेणे अत्यावश्यक बनले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close