सामाजिक

कमी विद्युत पुरवठ्याचे कारण देत पडसा येथील वॉटर फिल्टर तब्बल दोन वर्षांपासून बंद ; दुसरे गायब..?

नागरिक पिण्याच्या शुद्ध पाण्यापासुन वंचित ; गटविकास अधिका-यांकडे तक्रार.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

  किनवट/माहूर

   नागरीकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या दोन वॉटर फिल्टर पैकी एक गायब तर दुसरे कमी विद्युत पुरवठ्याचे कारण देत तब्बल दोन वर्षांपासून बंद असल्याने नागरिक पिण्याच्या शुद्ध पाण्यापासुन वंचित राहत असल्याची तक्रार पडसा येथील महिला पत्रकाराने गटविकास अधिका-यांकडे केली असून याप्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे..

 

  माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथील महिला पत्रकार फरजाना जावेद शेख यांनी माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदनातून कळविल्यानुसार ग्रामपंचायत कार्यालय पडसा ता. माहुर जि. नांदेड येथे नागरीकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले वॉटर फिल्टर प्लॉंट मागील दोन वर्षापासून बंद अवस्थेत असून प्रत्यक्षात मात्र कोणतेही कारण नसताना धुळ खात पडून आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनास विचारणा केली असता फिल्टर प्लॉंट ला लागणारा विद्युत दाब कमी मिळत असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून सदरचे वॉटर फिल्टर बंद असतानाही ग्रामपंचायत प्रशासन बघ्याची भुमिका घेत केवळ वेळ मारून नेत आहे…
    विशेष म्हणजे पडसा गावात कागदोपत्री असलेल्या दोन वॉटर फिल्टर प्लॉंट पैकी एक प्लॉंट ग्रामपंचायत प्रशासनाने गायब कल्याचा गंभीर आरोप ग्रा.पं. प्रशासनावर केला असून ग्रा.पं. प्रशासनाच्या बेवारस कामांमुळे गावातील सामान्य नागरीकांना पिण्याच्या शुध्द पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे. त्यासाठी संबंधित कामाची योग्य प्रकारे चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कार्यवाही करुन पडसा येथील नागरीकांना तातडीने दोन्ही फिल्टर प्लॉंट सुरू करून देण्याची मागणी केली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close