माहूर शहरातील दोन वेगवेगळ्या “भिमजयंत्या” स्वयंघोषित नेतेमंडळींसाठी ठरतेय पर्वणी…
"समाजातील फुट मिटविण्याऐवजी दोन्हींकडे मिरवण्यात स्वयंघोषित नेतेमंडळींना धन्यता ; एकीकडे 'स्वागताध्यक्ष' तर दुसरीकडे 'समाजभूषण'..?? "सामाजिक चळवळ की प्रसिद्धीसाठी वळवळ समाजमनातून कठोर चर्चेला उधान"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीउत्सवाच्या निमित्ताने माहूर शहरात होत असलेल्या दोन वेगवेगळ्या जयंती समोरोहाच्या निमित्ताने समाजासाठी असलेली सर्वात घातक बाब पुढे येत असून ‘समता, स्वातंंत्र्य आणि बंधुभाव’ या तत्वावर वाटचाल करणा-या समाजात पडलेली उभी फुट भरून काढण्याऐवजी त्या फुटीरतेची दरी रूंगावण्यात धन्यता बाळगून असलेल्या स्वयंघोषित नेतेमंडळींसाठी होत असलेल्या दोन वेगवेगळ्या “भिमजयंत्या” अक्षरश: पर्वणी ठरत असल्याचे दिसून येत असतानाच एकीकडे ‘स्वागताध्यक्ष’ तर दुसरीकडे ‘समाजभुषण’ या ‘उपाधी’ साठी आपली शेखी मिरवणा-या स्वयंघोषित पुढा-याबरोबरच आयोजक मंडळी व इतर सामाजिक नेत्याची ही “सामाजिक चळवळ की प्रसिद्धीसाठी केली जाणारी वळवळ.? याबाबत समाजमनातून कठोर व विद्रोही चर्चेला आता पेव फुटले आहे…..
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका हा एकेकाळी मराठवाड्यात धम्मचळवळीसाठी अग्रेसर होता. परंतू सामाजिक चळवळीतून आर्थिक विकासाकडे वाटचाल करून चळवळीचे काही खांदेकरी गब्बर बनल्याचे पाहून त्याच स्वयंघोषित समाजपुढा-यांचा विकास पाहून त्यांचे “झिलकरी’ देखील वेगळी चूल मांडून याच धंद्यात उतरले.. झाले काय..? शेवटी चळवळीचा अगदी बुगदा…??? अगदी त्याच दिशेने माहूर शहरातील आंबेडकरी चळवळीची वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने २९ मार्च २०२५ व ११ एप्रिल २०२५ या दोन वेगवेगळ्या दिवशी समाजातील उदयोन्मुख व प्रभावी असलेल्या दोन गटांच्या दोन भिमजयंत्यांची दोन वेगवेगळी प्रसिद्धीपत्रके तालुक्यातील बहुतांश गावांतील भितींवर लावून ‘शानदार’ प्रसिद्धीसोबतच ‘दमदार’ वसूलीही जोमाने करत आहेत.. अशात मुठभर फुटीरतावादी सोडले तर बहुतांश एकतावादी समाजबांधवांना ही बाब खटकत असून आजवर एकसंध असलेल्या माहूर शहरात आता समाजकार्याच्या नावाखाली स्वत:ची तुमडी भरून घेणा-या आसामींत कमालीची स्पर्धा सुरू झाल्याचे धगधगते वास्तव समोर येत असल्याने समाजमनातील भावना अक्षरश: खळवळल्या असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे…
दरम्यान शहरात होत असलेल्या दोन जयंती उत्सवात नेतेमंडळीची मात्र चांदीच चांदी होताना दिसत असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर ‘कौन बडा’ ची शर्यत लागल्याचे दिसून येत आहे.. विशेष म्हणजे भविष्यातील जि.प. सदस्यपदाचे डोहाळे लागलेली काही मंडळी दोन्ही जयंती उत्सवाच्या प्रसिद्धीपत्रकात चमकत असून बोगस सर्वधर्मीय विवाह मेळाव्याच्या बोगसगीरीतून समाजकल्याण विभागाने अक्षरश: तडीपार केल्याची परिस्थिती असलेला एक स्वयंघोषित नेता दोनही जयंत्यापैकी एकीकडे ‘स्वागताध्यक्ष’ तर दुसरीकडे ‘समाजभूषण’ या उपाधीवर नजर गाडून बसला आहे.. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की दोन्ही गटांकडे जर याच नेत्याचा पुरेसा मानसन्मान असेल तर दोन्ही गटांना एक करण्यास या नेत्याला अडचण काय..? तथापि, दोन्ही गटांना एकत्र केल्यास निश्चितच त्याची प्रतिमा सुधारेल यात दुमत नाही.. परंतू समाजात पडलेल्या उभ्या फुटीला भरून काढण्याऐवजी त्याच फुटीरतावादी गटाच्या दोन्ही थड्यांवर हात ठेवून आपली ‘शेखी’ मिरवणा-या समाजातील त्या स्वयंघोषित नेत्याला उभ्याने दोन्ही हात जोडून “कडक जयभीम” करण्याऐवजी समाजाकडे तुर्तास तरी पर्याय नसून काहींनी आज जरी डोक्यावर घेतले असले तरी आगामी काळात मात्र निश्चितच डोक्यावरून खाली आदळणार यात तिळमात्रही शंका नसल्याची भावना एकतावादी समाजमनातून व्यक्त होत आहे….
विशेष म्हणजे शहरात होत असलेल्या दोन वेगवेगळ्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने… शहर एक, मात्र जयंत्या दोन असे का..? असा प्रश्न आमच्या वृत्तवाहीनीने दोन्ही जयंती उत्सवाच्या आयोजकांना केला होता… त्यानुसार एका आयोजकाच्या म्हणण्यानुसार त्यांची जयंती पुर्वापार व परंपरागत चालत आलेली असून होत असलेली दुसरी जयंती ही वैयक्तिक व ऐच्छीक असल्याचे सांगून आमची जयंती व चळवळ ही खरी असल्याचे सांगितले आहे.. तर दुस-या जयंती उत्सवाच्या आयोजकाने दिलेल्या प्रतिक्रियेप्रमाणे पहिल्या जयंती उत्सवाचा हिशोब कधीच दिला जात नाही. शिवाय दमदार वसूली करून आपला ‘किरदार’ बनवण्याचा धंदा असल्याचे म्हटले आहे…
परंतू एकमेकांच्या विरोधात आयोजकांचे मत काहीही असले तरी समाजमनाच्या दृष्टीने एकसंध जयंतीऐवजी होत असलेल्या दोन वेगवेगळ्या जयंत्या ह्या कुणाच्याही पचनी पडत नसून स्वार्थासाठी अनेक राजकीय पक्षांच्या वा-या करून समाजातही राजकारण शिरवणारे मुठभर पुढारी व त्यांचे ‘वसुलीकींग’ हस्तक सोडले तर समाजातील फुटीची ही बाब कुणाच्याही पचणी पडणार हेच अंतिम सत्य आहे… त्यामुळे “एक असाल तरच नेक असाल…!” या समाजासाठी उपयुक्त विचाराची पार ‘एैशी-तैशी’ करून समाजमनातील भावनेेेला अक्षरश: खाटल्यावर घालणा-या समाजातील अशा “फाटक्या पुढा-यांनी” चालवलेला फुटीरवादाचा हा गोरखधंदा वेळीच थांबवावा. अशी क्रांतिकारी खदखद समाजमनातून समोर येत आहे…

