ईतर

माहूर वनविभागाच्या संगनमताने वनपरीक्षेत्राअंतर्गत अवैध वृक्षतोड जोरात….

"वनपरिक्षेत्र अधिका-यांचे अक्षम्य दुर्लक्ष ; अवैध लाकूड व्यवसायीकांसोबत 'सेटींग' असल्याचा आरोप"

(Bkमहाराष्ट्र न्युज नेटवर्क)
ब्युरो चिफ/ बाबाराव कंधारे
      माहूर वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत अवैध वृक्षतोडीच्या संख्येत विक्रमी स्वरूपात वाढ झाली असूून उघड्या डोळ्याने सर्वकाही दिसत असतानाही अवैध वृक्षतोडीसंदर्भात वनविभाग मौन धारण करून असल्याने वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या कार्यप्रणालीवर निसर्गप्रेमींकडून थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात  आहेत…
    माहूर तालुक्याचा बहुतांश परिसर हा घनदाट जंगल व पहाडी म्हणून प्रसिद्ध आहे. हेच जंगल कुख्यात नक्षलवादी विजयकुमार याचे तत्कालिन काळात कार्यक्षेत्रही होते. आणि याच जंगलात तो मारलाही गेला होता. परंतू माहूर तालुक्यातील घनदाट जंगलासंबंधीची वर्तमान परिस्थिती पाहता जंगल व परिसर अत्यंत विरळ होत चालल्याचे भयान वास्तव असून वनपरिक्षेत्र अधिका-यांचा परिक्षेत्रांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांवर अंकूश नसल्याकारणाने अवैध लाकूड तोड्यांचा “सुवर्णकाळ” आल्याचे दिसून येत आहे. 
   विशेष म्हणजे शासन दरवर्षी वृक्षलागवडीसाठी कोट्यावधींचा खर्च करते. या निधीचा विनियोग माहूर परिक्षेत्रात कुठे, कसा व किती झाला ही संशोधनाची बाब असूून वृक्षलागवडीसाठी खर्च केलेल्या निधीची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी झाल्यास मोठे घबाड हाती लागण्याची दाट शक्यता तालुक्यातील जनतेतून बोलल्या जात आहे.
     एकंदरीतच माहूर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत असलेल्या गावात बहूमुल्य सागवानासह लिंब, अजंन, चिंच, धावडा, काटशेवरी, रोहन अशा अनेक गैरीच्या झाडांची मोट्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असून वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांच्याच मुकसंमतीने सदरचा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने दिवसाढवळ्या तोडलेल्या झाडाचे ट्रक वाहतूक पास नसतांनाही वाहतूक करीत असल्याने संपुर्ण वनविभागच छुप्या पध्दतीने या प्रकारास पाठींबा देत असल्याचे जनतेतून उघडपणे बोलले जात आहे.
    
विशेषत: वृक्षसंवर्धनासाठी दरवर्षी शासनाकडून मोठा गाजावाजा करून वृक्ष लागवड केली जाते. तर वृक्ष संवर्धनावर देखील कोट्यावधींंचा खर्च करण्यात येतो.  मात्र वृक्ष तोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना केली जात नाही. हे आदिवासी बहूल माहूर तालुक्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल..! 
★ महाराष्ट्रात झाडे तोडण्यासबंधीचा कायदा अस्तित्वात असून अधिनियम १९६६ मध्ये त्याबाबत नियमावली आहे.  
★ तसेच वृक्ष तोड मनाई कायदा १९६८ पासून साग, चिंच, जांभूळ, आंबा इत्यादी झाडे तोडण्यास बंदी आहे…
★  वनविभागाच्या परवानगी शिवाय कोणत्याही ठिकाणावरील कोणतेही वृक्ष तोडता येत नाहीत.. 
याचा बहुधा विसर माहूर वनपरिक्षेत्र अधिका-यांसह वनविभागालाही पडला असल्याने कोणत्याही प्रकारची वृक्षतोड परवानगी नसतांनाही माहूर तालुक्यातील वाई बाजारसह आसोली, आष्टा, वडसा, पडसा, टाकळी, मुरली, लांजी, नेर, लिबायत, लखमापूर, हरडप, गोकूळ, गोंडेगाव, अंजनखेड, तुळशी, बंजारा तांडा यासह अनेक गावातून गैरीची  तोड मोठ्या प्रमाणात होत असून त्याउपरही आश्चर्याची बाब म्हणजे आज पर्यंत वनविभागाची एकही कारवाई नाही हे विशेष..!! 
१५० ते २०० गोलाई व १५ ते २० वर्ष वय असलेल्या झाडांची अवैध वुक्षतोड.. संततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी शेतक-यांच्या शेतात  पुसद, हिवरा, महागाव, किनवट, हदगाव येथील लाकूडतोड ठेकेदार जाऊन शेतातील बांधा वरील, नाल्याशेजारील जगंल व जंगला शेजारील गायरानातील  झाडांची चक्क पाचशे ते हजार रु. प्रती झाड अशा कवडीमोल किमतीत खरेदी करून मशीनद्वारे झाडांची कत्तल करत क्रेनच्या साह्यायाने तेच ट्रक मध्ये भरत असल्याने हा गंभीर प्रकार संबंधित वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक ह्यांना माहित नाही..? का केवळ पगारीत भर पाडण्यासाठी चुप्पी साधली हा प्रश्न अनाकलनीय होवून बसला आहे. त्यामुळे माहूर रेंज मध्ये होत असलेल्या या गैरप्रकारावर उपवन संरक्षक नांदेड यांनी तातडीने पथक पाठवून तपासणी करावी. तसेच दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी निसर्गप्रेमी बांधवांसह जनतेतून होत आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close