किनवट येथील डॉक्टरकडून कामासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार ; गुन्हा दाखल
"वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी किनवट येथील धक्कादायक घटना"
(Bk महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट, (दिलीप पाटील)
वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी धक्कादायक घटना काल दि.७ रोजी किनवट येथे उघडकीस आली असून शहरातील शरयू हॉस्पिटल एका डॉक्टरकडून कामाला ठेवलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर तब्बल बारा वेळ बळजबरी अत्याचार केल्यानंतर सदरची मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपातही केला. याबद्दलची तक्रार पिडीत मुलीने किनवट पोलीस ठाण्यात दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किनवट येथील शरयू हॉस्पिटलचे डॉक्टर विकास सुंकूरवाड यांनी कामासाठी ठेवलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तब्बल बारा वेळेस बळजबरी संभोग केल्याने सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आणि दिनांक 6 मे २०२२ रोजी तिचा गर्भपात करण्यात आला. याबद्दलची तक्रार सदर पीडित मुलीने किनवट पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यावर 376, (2) (1) (एन) 506 सहकलम 4, 6, पोक्सो अँक्ट प्रमाणे सदर डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार मुलगी ही गरिबी आणि बिकट परिस्थितीमुळे नोव्हेंबर २०१९ पासून ते मार्च २०२२ पर्यंत डॉ. विकास सुंकलवाड यांच्या शरयु हॉस्पिटलमध्ये सफाईगार म्हणून 2000 रुपये प्रति महिना पगारी वर कामास होती. पण सदर असाह्य मुलीवर सदर डॉक्टराची पापी नजर पडली अन त्या निच डॉक्टरांने सतत दिवस व रात्रीच्या बारा वेळेस अतिप्रसंग करत संभोग करत आपली कुवासना भागवली. अश्या आपल्या लेखी तक्रारीत मुलीने नमूद केले आहे. या अशा प्रसंगाला कंटाळून व हा प्रसंग कोणाला सांगशील तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिल्यामुळे सदर मुलीने तेथील काम बंद केले. दरम्यान दि. 6, मे 2022 रोजी तिच्या पोटात वेदना होत होत्या म्हणून तिने डॉक्टर व लँब येथे तपासणीसाठी गेली होती. तेथेच तिचा गर्भपात झाला पण अंदाजे पाच ते सहा महिन्याचा गर्भपात कसा झाला हा प्रश्न पडत असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मानुसकीला व वैद्यकीय पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरात व वैद्यकिय वर्तुळात खळबळ माजली आहे. देवाचे रूप म्हणून समाजात प्रतिष्ठेने ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टरांकडूनच असा नीच काळिमा फासणाऱ्या घटना होत असतील तर विश्वास कुणावर करायचा हा मोठा प्रश्न पडला आहे.आणि अशा कुकर्म करणार्या डॉक्टरांवर कार्यवाही होऊन कारागृहाची जन्म ठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

