ईतर

परिक्षा देवून घराकडे जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला दहेलीनजीक भिषण अपघात…

"दोन विद्यार्थी ठार ; एकाची प्रकृती चिंताजनक..?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
सारखणी/रशीद फाजलानी
   माहूर तालुक्यातील अंजनखेड येथून बारावीचा पेपर देवून घराकडे जात असलेल्या दहेली येथील विद्यार्थ्यांच्या दुचाकीला दहेलीनजीक भिषण अपघात झाला असून या अपघातात दोन विद्यार्थी ठार तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने संपुर्ण दहेली गावावर शोककळा पसरली आहे…
    किनवट तालुक्यातील मौजे दहेली येथील प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार व गणेश तोटावार हे बारावीचे विद्यार्थी मौजे दहेली तांडा येथील स्व. संगिताबाई मा. व उच्च मा. विद्यालयात शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.. तथापि बारावी परिक्षेचे सेंटर माहूर तालुक्यातील मौजे अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले मा. व उ.मा. विद्यालय आल्याने ते परिक्षेचा पेपर देण्यासाठी दुचाकीवरूूू ये-जा करत असल्याची चर्चा आहे….दरम्यान आज दि. २ मार्च रोजी सकाळी ११ ते २ या कालावधीतील बोर्डाचा पेपर देवून ते आपल्या गावाकडे निघाले असता दहेली गावा नाजीकच्या एका वळणावर त्यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळली… यात  प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार, गणेश तोटावार हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यावेळी दहेलीचे सरपंच राकेश तोटावर यांनी खाजगी वाहनाद्वारे जखमींना दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नेले. तर तेथे प्राथमिक उपचार करून रूग्णवाहिकेतून यवतमाळ  येथे हलवण्यात आले… दरम्यान यवतमाळ येथे पोचल्यानंतर यातील प्रतिक लेंडे व कृष्णा बोंतावार या विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले…तर गणेश तोटावर या विद्यार्थ्याच्या पायाला जबर मार लागल्याची माहिती समोर येत आहे.. त्यामुळे संपुर्ण दहेली गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close