पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना माहूर मध्ये श्रद्धांजली…!
"माहूर नगर पंचायतीच्या वतीने आयोजित शोकसभेत काळ्या फिती लावून घटनेचा निषेध"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर
काश्मीरच्या पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या क्रूर कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माहूर नगर पंचायतच्या वतीने एका शोकसभेचे काल दिनांक २५ शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आयोजन करण्यात आले होते.या वेळी मेणबत्ती प्रज्वलित करुन व काळ्या फिती लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली…
मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला.ज्यात पर्यटनासाठी आलेल्या २८ निष्पाप भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यु झाला. तर अनेक पर्यटक,स्थानिक व्यावसायिक,नागरिक जखमी झाले.या हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली असून या घटनेबाबत देशभरातुन तीव्र रोष व्यक्त केला जात असून केंद्र सरकारने पहेलगाम, सह जम्मू काश्मीर मधील सर्व पर्यटन स्थळाची सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करावी आणि दहशतवाद्याना धडा शिकवावा असा सूर नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मनोज कीर्तने, अजीम सय्यद, नंदू संतान,यांनी निषेधात्मक भाषणातून काढला.तर नायब तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक दिगंबर पाटील, डॉ विपिन बाबडे यांनी हल्ल्यातील मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात केली.
*दहशतवादी हल्ले हे मानवतेवर घाला घालतात.
पहलगाममधील निष्पाप भारतीय पर्यटक नागरिकांच्या हत्येची घटना ही प्रत्येक भारतीयांच्या मनाला अतिशय वेदना देणारी असून केंद्र सरकारने यासारख्या घटनांवर कठोर निर्णय घेण्याची आणि जशास तसे ठोस उत्तर देण्याची गरज असल्याचे सांगत “तुम गोली चलाओ हम सीने पर खायेंगे, तुम्ह सर काटोगे यहा दस सर उठायेंगे… ये हिंदुस्तान की मिट्टी है साहाब, या हर घर से भगतसिंग निकल कर आएंगे….” अशा शायरी तुन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, उपनगराध्यक्ष नाना लाड, नगरसेवक विजय कामटकर, गोपू महामुने, नगरसेवक प्रतिनिधी रणधीर पाटील, इरफान सय्यद, रफिक सौदागर सुमित खडसे, निसार कुरेशी, अप्सर आली, विक्रम राठोड, सुमित खडसे, वसंतराव कपाटे, भाजपचे विजय आमले, पद्मा गिऱ्हे, अपील बेलखोडे, काँग्रेस चे नगरसेवक प्रा.विलास भंडारे, अजीम सय्यद, किसन राठोड, किशोर जगत, गजानन भारती, दत्ता शेरकर, दीपक कांबळे, रेणुकादास वानखेडे, गोविंद मगरे पाटील, मझर खान, शकील शहा, इरफान टेलर, अशीफ पैलवान, मुस्ताक शेख, शफीक शेख, बाबर अहमद,नाना पाटील यांची उपस्थिती होती. संचलन एस.एस.पाटील यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली…

