क्राइम

पार्टी करण्याच्या कारणाने नदीवर नेवून पत्नीसह दोन अल्पवयीन मुलींना पाण्यात बुडवून मारले ; कारण अस्पष्ट

"किनवट तालुक्यातील मारेगाव (खालचे) येथील अमानवीय घटना..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

  पार्टीच्या करण्याच्या बहाण्याने नदीवर नेवून पोहता येत नसतानाही पत्नीसह दोन अल्पवयीन मुलींना पाण्यात बुडवून मारल्याची खळबळजनक घटना घडली असून या अमानवीय घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या घटनेने संपुर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे..

   किनवट तालुक्यातील मौजे मारेगाव (खालचे) येथील लक्ष्मी देवीदास कांबळे वय 40 वर्षे जात- मातंग रा. मारेगाव खालचे ता. किनवट जि. नांदेड यांनी किनवट पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची ननंदेेची मुलगी नामे ममता हिचे लग्न मुस्लीम समाजाच्या जावेद शेख इब्राहिम शेख रा. सायफळ ता.माहूर जि. नांदेड ह्याचे सोबत अडीच वर्षा पुर्वी लावुन दिले होते. तर तिची ननंद रेखा ही बिहार येथील एक भुमी हार ब्राम्हण समाजाच्या मिथुन कुँवर सदानंद कुवर ह्याचे सोबत राहते. त्यामुळे ममता व तिचा नवरा जावेद याचे पटत नसल्यामुळे मागील दिड महिण्यांपासून ममता ही मारेगाव खालचे येथे तिचे
आई सोबत राहत होती…
 दरम्यान रविवार दि. २६ मे रोजी दुपारी अंदाजे एक ते दिड वाजताचे सुमारास जावेद शेख हा मारेगाव खालचा येथे आला.  तर दि.२७ मे रोजी सकाळी अंदाजे दहाच्या सुमारास जावेदने नदीला जाऊन पार्टी करण्याचे लेकरांना म्हणाला. तेव्हा नदीला नको पाण्यात लेकर पडतील असे सांगीतले असताना जावेदसह ममताने लेकरांना घेवून जाण्याची विनवणी केल्यानंतर आम्ही त्यांना परवानगी दिली. त्यानंतर तो माझ्या दोन मुली नामे पायल व स्वाती यांना व जावेद हिची बायको ममता ह्या तिघांना त्याचे गाडीवर बसवुन घेवुन नदीकडे पार्टीचे साहीत्यासह घेवुन गेला. त्यानंतर ननंद रेखा व मिथुन हे देखील गाडीवर बसुन नदीकडे गेले. व माझ्या ननंद हिस मिथुन नदीला सोडुन माझ्या लेकराला नेण्यासाठी गाडी घेवुन येवुन मला व माझे दोन लेकरे नामे दिपक व नंदणी यांना घेवुन नदीला गेला… त्यानंतर ममताने बिर्याणी केली. त्या सर्वानी मिळुन बिर्याणी खाल्ली. 
 त्यावेळी दुपारी अंदाजे दोन वाजताच्या सुमारास पैनगंगा नदीत जावेद व मिथुन हे माझी मुलगी पायल, स्वाती व ममता हिस पाण्यात खेळण्यासाठी घेवुन जात होते. तेव्हा लेकरांना पोहायला येत नाही त्यांना पाण्यात घेवुन जावू नका. लेकर बुडतील असे सांगत होतेच.. ते हो हो म्हणत माझ्या मुली पायल व स्वाती तसेच ममता ह्यांना खोल पाण्यात घेवून गेला.. त्यावेळी अचानक लेकरे बुडायला लागल्याने आरडाओरडा केला. परंतु जावेद व मिथुन हे पायल, स्वाती, ममता हिस वाचवण्या ऐवजी तेथुन बाहेर निघुन मिथुन हा मोटारसायकल घेवुन पळुन गेला… त्यावेळी जावेद हा पळत असतानाच तो पकडला गेला…त्यावेळी जावेदची पत्नी ममता हिच्यासह स्वाती देवीदास कांबळे वर्ग ९ वा. व पुजा देवीदास कांबळे वर्ग १० वा. यांचा दुर्दैवी मृत्यू झाला..
एकंदरीतच त्यांना त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने नियोजनबद्द रित्या घडवून आणलेल्या या अमानवीय घटनेने संपुर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून लक्ष्मी देवीदास कांबळे रा. मारेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज दि. २८ मे रोजी किनवट पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३७/२०२४ कलम ३०४, ३४ भादवी, तसेच अनुसुचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३ (२) (va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी जावेद शेख इब्राहीम व मिथून कुवर भुमीहार यांना किनवट पोलीसांकडून अटक करण्यात आले असले तरी प्रकरणाचे कारण अद्याप समोर आलेले नसल्याने विविध शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close