क्राइम
ओंकार कुलकर्णी आत्महत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरारच….!
"महिणाभरापासून आरोपींकडून पोलीसांच्या हातावर तुरी..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
नांदेड/प्रतिनिधी
बहुचर्चित ओंकार कुलकर्णी आत्महत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरारच असून दि.१७ जून २०२२ रोजी ओंकार कुलकर्णी या २९ वर्षीय युवकाने पत्नी व व्यवसायातील पार्टनर च्या जाचास कंटाळून नांदेड शहरातील पौर्णिमा नगर भागातील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती…

आत्महत्या करण्यापूर्वी ओंकार ने फेसबुक वर जय श्रीराम… सगळं संपलं.. आता फक्त स्वतःला संपविण्याचे बाकी आहे…!”असे स्टेटस अपलोड करून त्याच रात्री अंदाजे २ वाजेच्या सुमारास स्वतःला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवील्याची दुर्दैवी घटना घडली होती. ही उघडकीस आल्यानंतर मित्रवर्गासह सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान दि.१७ जून २०२२ रोजी गळफास घेण्यापुर्वी ओंकारने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्याच्या मरणास कारणीभुत त्याचा व्यावसायीक भागीदार महेंद्र कुळकर्णी याच्यासह त्याची पत्नी पुजा व नांदेडात वावरत असलेला एक स्वयंघोषित वकील आशिष दुबे आहेत असे सांगीतले होते….


तसेच पुजाची आई अनिता दिलीप केंद्रे हिने देखील ओंकारचे मानसिक खच्चीकरण केले असल्याने त्याने मानसिक दबावाखाली गळफास घेवून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्यामुळे ओंकारची आई मीना प्रदीप कुळकर्णी रा. पौर्णिमानगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात ओंकारचा व्यावसायीक भागीदार महेंद्र मुरलीधर कुळकर्णी याच्यासह पत्नी पुजा ओंकार कुळकर्णी, स्वयंघोषित वकील आशिष दुबे व पत्नी पुजाची आई अनिता दिलीप केंद्रे यांच्यावर कलम ३०६, ५०६, ३४ भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होते….
विशेष म्हणजे ओंकारच्या आत्महत्येस जबाबदार असलेले दोषी मात्र अद्यापही मोकाटच फिरत असून मयत ओंकारची आई मीना प्रदीप कुलकर्णी ह्य मयत मुलास न्याय मिळावा यासाठी दारोदार भटकंती करताना दिसत आहे… दरम्यान गुन्हा दाखल होवून तब्बल महिन्याभराचा कालावधी लोटला असला तरी सर्व आरोपी गुन्हा दाखल होताच “टांगा पल्टी घोडे फरार” झाले असल्याने या प्रकरणी तपासकामी असलेल्या विमानतळ पोलिसांना अद्यापही त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले नसल्याने या निमित्ताने अनेक चर्चांना उधान आल्याचे चित्र आहे…
★ घडल्याप्रकारापासून समाजाने बोध घ्यावा..★
समाजात दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत असल्याने या बाबीचा तांत्रिक लाभ उठवून पुजा सारख्या काही मुली समाजातील शांत व भावनिक मुलांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने केवळ मतलबापुरते लग्न करण्याचे ढोंग करीत आहेत. एकवेळ लग्न झाल्यानंतर मग त्यांना भावनिक करून व त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेवून त्यांना मरणाच्या खाईत लोटत आहेत… हा प्रकार कुठेतरी थांबणे आवश्यक असून माझ्या ओंकारसोबत जे घडले ते इतर कुणासोबतही घडू नये… यासाठी समाजाने जागृत रहावे असे मी समाजाला कळकळीचे आवाहन करते…..
-मिना प्रदीप कुलकर्णी…

