राजकिय

‘होऊ द्या चर्चा’ शिवसेना अभियानाचा श्रीक्षेत्र माहूर शक्तीपीठातुन शुभारंभ..!

'केंद्र व राज्य शासनाच्या विविध बोलघेवड्या योजनांचा होणार भांडाफोड'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

माहूर/प्रतिनिधी

‘होऊ द्या चर्चा’ या शिवसेनेेेेच्या अभियानाचा माहूर शक्तीपीठातुन शुभारंभ करण्यात आला असून यानिमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्या विविध बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्याचा निर्धार शिवसेनेकडून (उबाठा) करण्यात आला..

 

शिवसेना नेते सुहासजी सामंत यांच्यासह सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ, जिल्हा प्रमुख मा.आ.नागेशदादा पाटील आष्टीकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख लोकनेते ज्योतिबादादा खराटे, युवासेना जिल्हा प्रमुख यशभाऊ खराटे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान,  तालुका प्रमुख मारोती दिवसे पाटील तसेच अन्य पदाधिका-यांच्या प्रमुख उपस्थितीत आज माहूर येथून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा “करूया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड’  “होऊ द्या चर्चा” या शिवसेनेेेेेच्या (उबाठा) अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या देवदर्शनाने करण्यात आला.

 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा अभियंता तथा उपसरपंच सुशिल जाधव, प्रा.रविंद्र गायकवाड, युवती सेना तालुका प्रमुख सौ.सुरेखाताई बालाजी तळणकर, शहर संघटक सुरेश आराध्ये, युवासेना तालुका प्रमुख अक्षय वाघ, शहर प्रमुख शेख वसीम, अभिषेक दुबे, अरविंद दवणे व बहुसंख्य शिवसैनिक, युवासैनिक, युवती सेना, आजी-माजी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले तर सर्वांचे विशेष आभार शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव, सोशल मीडिया विधानसभा प्रमुख गजानन चव्हाण यांनी मानले. तर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close