सामाजिक

नांदेड येथे शास्त्रानुकूल भक्ती संदेशाचा प्रचार-प्रसार…

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

नांदेड, प्रतिनिधी

 नांदेड़ शहरातील बऱ्याच ठिकाणी भव्य पुस्तक सेवा आयोजित केली गेली, ज्यामध्ये गाव, शहरं आणि खेड्यांमध्ये जाऊन ज्ञानवर्धक पुस्तकांचं वितरण केलं गेलं. या सेवेमध्ये विशेषतः संत रामपाल जी महाराज यांनी लिहिलेली पुस्तकं, जसं “ज्ञान गंगा”, “जगण्याचा मार्ग” आणि “गीता तुझे ज्ञान अमृत” यांचा समावेश करण्यात आला. या पुस्तकाच्या माध्यमातून शास्त्रानुकूल भक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला गेला.

 

संत रामपाल जी महाराज त्यांच्या प्रवचनांद्वारे आणि पुस्तकांद्वारे सांगतात की आपल्याला केवळ शास्त्रांनुसार भक्ती करायला हवी, ज्याचा पुरावा आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये, जसं वेद, गीता आणि पुराणं, आढळतो. जसं एखादा विद्यार्थी अभ्यासक्रमाबाहेरचं वाचन करतो, तर तो परीक्षेत नापास होतो, तसंच जर एखादी व्यक्ती शास्त्रांमध्ये वर्णिलेल्या विधीच्या विपरीत पूजा करते, तर ती परमेश्वराच्या प्राप्तीपासून वंचित राहते. संत रामपाल जी महाराज यांनी लिहिलेल्या “ज्ञान गंगा”, “जगण्याचा मार्ग” आणि “गीता तुझे ज्ञान अमृत” या पुस्तकांमध्ये ठिकठिकाणी शास्त्रांमधील प्रमाण दिलेले आहेत, ज्यामुळे हे सिद्ध होतं की खऱ्या अर्थाने भक्ती कायआहे ! या पुस्तकांमध्ये सांगितलं आहे की शास्त्रांमध्ये वर्णिलेल्या भक्ती पद्धतीचं पालन केल्यानेच पूर्ण मोक्षाची प्राप्ती होऊ शकते…

“संत रामपाल जी महाराज यांच्या शिष्यांद्वारे या पुस्तकांचं वितरण करण्याचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की लोकांनी शास्त्रांनुसार भक्ती करावी आणि मोक्षाचा मार्ग प्राप्त करावा. या सेवेमार्फत सर्व लोकांना प्रेरित केलं गेलं की त्यांनी या पुस्तकांचा अभ्यास करावा आणि शास्त्रांमध्ये वर्णिलेल्या खरी भक्तीचं पालन करावं. अशाप्रकारे देशात नव्हे तर संपूर्ण जगात शास्त्रानुकूल भक्तीचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संत रामपाल जी महाराज यांनी हा पुस्तक वितरण अभियान चालवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close