माहूरात ‘स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्षाला’ बेदम चोप.. ; तुफान हाणामारीच्या घटनेची चर्चा सोशल मिडीयावर प्रचंड वायरल..???
"स्वयंघोषित पत्रकारीतेच्या थोबाडावर चपराक ; पत्रकार म्हणूून मिरवणा-या अनेकांना भरली धडकी..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
माहूरात पत्रकारीतेच्या नावाखाली संघटनेची नोंदणी करून पत्रकार व संपादक म्हणून उपद्व्याप घालणा-या एका ‘स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्षाला झालेल्या तुफान हाणामारीच्या घटनेची चर्चा सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत असून स्वयंघोषित पत्रकारीतेच्या थोबाडावर जणू चपराक लागावी अशी खळबळजनक घटना समोर आल्याने पत्रकार म्हणूून मिरवणा-या अनेकांना अक्षरश: धडकी भरली असल्याचे दिसून येत आहे….
“अती तेथे माती ” या उक्ती प्रमाणे काल दिनांक ५ शनिवार रोजी चक्क माहूर पोलिस ठाण्याच्या आवारातच स्वंयघोषित पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या एका राष्ट्रीय अध्यक्ष महाशयाची यथेच्छ धुलाई झाल्याचे विश्वसनीय वृत्त असून या बाबत समाज माध्यमावर चविष्ट पोस्ट वायरल होत असल्याने त्या बोगस पत्रकार व त्यांच्या संघटनेचे चांगलेच धिंडवडे निघाले आहे…तथापि, काल रोजी घडलेल्या घटनेचा मागोवा घेताना विश्वसनीय सुत्रांकडून खळबळजनक माहिती पुढे आली असून पत्रकारितेचा आव आणणाऱ्या ‘त्या’ महाशयाची रेती वाहतुकदारांसोबतची सेटींग जमली नसल्यानेच हा प्रकार घडल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर एका रेती वाहतुकदाराने सांगितले आहे… दरम्यान रेतीघाटावर सेटींग सेटींग न झाल्याने व्यथीत होवून त्याच संघटनेतील काही मोठे पत्रकार मागील काही दिवसांपासून “पैनगंगा” भ्रमण करीत जागोजागी कॅमेरे फिरवत असल्याचेही समोर आले आहे… त्यात संघटनेतील पत्रकारांचा आकडा सांगून वाहतुकदारांकडून दरमहा मोठ्या रकमेची मागणी झाल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे… तर करण्यात आलेली मागणी फिस्कटल्याने त्यातील एकाने शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा समाज माध्यमावर बदनामी करणारा मजकूर प्रकाशित केला होता. व त्याचे पुरावे आढळून आल्यानंतर या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी शिवसेनेच्या त्या कार्यकर्त्यांनी माहूर पोलीस ठाणे गाठले असता ” त्या ” राष्ट्रीय अध्यक्षा सोबत तक्रारदाचा शाब्दीक वाद झाला.. त्यानंतर मात्र या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन पत्रकार संघाच्या त्या राष्ट्रीय अध्यक्षाला चांगलाच महाप्रसाद देण्यात आल्याची चर्चा आहे…
“पत्रकारितेच्या नावाखाली संघटनेची नोंदणी करून व आकर्षक ओळख पत्र वाटून एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे शाखा उघडण्याच्या हेतूने सेटींगची व्यवस्था करण्याबरोबरच विविध पदांची अक्षरश: खैरात वाटण्याचा प्रकार माहूर तालुक्यात मागील दोन वर्षापासून सुरू असल्याचे सर्वश्रुत आहे… पत्रकारीतेचा “प” तर सोडाच हो..? पण अगदी स्वत:चे नाव देखील सुटसुटीत लिहू न शकणा-या अनेक स्वयंघोषीत पत्रकारांनी माहूर तालुक्यात मागील दोन वर्षांपासून अक्षरश: उच्छाद मांडला असून आज मितीस पत्रकार म्हणून मिरवणा-या महाशयाची जनगणना झाल्यास तालुक्यातील स्वयंघोषित पत्रकारांचा आकडा हा शंभरी गाठेल अशी परिस्थिती आहे….
विशेष म्हणजे पीआरबी कायदा १८६७ च्या कलम ५ नुसार कायद्यात घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्याशिवाय भारतात कोणतेही वृत्तपत्र प्रकाशित केले जाऊ नये.. तर यातीलच कलम ११(ब) अंतर्गत प्रत्येक वृत्तपत्र किंवा नियतकालिकाची प्रत प्रेस रजिस्टारकडे पोहोचवणे अनिवार्य आहे.. त्यामुळे देशात कोणतेही नियतकालिक अथवा वृत्तपत्र प्रकाशित करण्यासाठी आरएनआय कडे नोंदणी करणे ही एक पुर्वअट आहे…
परंतू केवळ आणि केवळ मोबाईल तसेच वॉट्सअप पत्रकारीता करताना जास्तीत जास्त साठ रूपयाचे ओळखपत्राची दोरी गळ्यात घालून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची अक्षरश: खिल्ली उडवत आहेत.. स्वयंघोषित व स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणारे काही चिंधीचोर कॉपीपेस्ट व फकाट पत्रकार ‘वसूली’ नामक मातेच्या उदरी जन्मास आले असून यामुळे पत्रकार व पत्रकारीतेचे भविष्य काय..? हा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे… एकंदरीतच पवित्र (पतीव्रता) पत्रकारीता आज अपवित्र (छिनाल) पत्रकारीतेच्या विळख्यात अडकल्याचीच परिस्थिती दिसूून येत असून पत्रकारीतेच्या पवित्र मळ्यात स्वत:ला ‘घोडे’ समजून अक्षरश: गाढवासारखा उच्छाद मांडून पत्रकारीतेचे ‘तिन तेरा’ करणा-या या प्रवृत्तीला आळा बसणे ही काळाची गरज असल्याचे मत जाणकार व लेखणीधारक पत्रकारांसोबतच जनमानसातून व्यक्त होत आहे…..
★ निमित्त वसूलीचे…….
सहाय्यक जिल्हाधिकारी कावली मेघना यांची बदली नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर झाल्यानंतर माहूर तालुक्यातील सर्वच रेती घाटावर बेसुमार रेती उपसा होत असून अवैध रेती व्यवसायिकांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे त्रिकालबाधित सत्य आहे.. मात्र या गैरप्रकारची बातमी छापण्यापेक्षा कुठलाही वृत्तपत्र किंवा अधिकृत वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी नसताना केवळ खैरातीमध्ये मिळालेल्या ओळखपत्राचा वापर करून वसुली बहाद्दर मंडळीने विविध रेतीघाटांवर जाऊन ‘हायदुल्हा’ माजवला आहे. मात्र अवैध रेती व्यवसायात प्रशासनातील अनेक विभागाचे हात ओले असल्याने या वसुली बहाद्दर मंडळीचे कुरण बाहेर पडत नव्हते.. मात्र निसर्गाच्या नियमानुसार “देर हे अंधेर नही” या उक्तीप्रमाणे काल शनिवार रोजी भांडाफोड होऊन वसुलीसाठी गेलेल्या त्या गोष्टीत राष्ट्रीय अध्यक्षााचा वाद विकोपाला जाऊन त्याला येथेच्छ प्रसाद मिळाल्याने बोगस पत्रकारांची टोळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. तथापि, पत्रकारितेचे काडीमात्र ज्ञान नसणारे अनेक जण आज रोजी कॉपी पेस्ट बातमीदारी करत आहेत. शिवाय लोकांची दिशाभूल करणे, बातमी लावतो म्हणून धमकावणे, आर्थिक मागणी करणे, ब्लॅकमेल करणे, खाजगी चित्रीकरण करणे, हप्ते वसुली करणे, शासकीय कार्यालयात विना परवानगी चित्रीकरण करणे, गाड्या अडवणे यासारखे गैरप्रकार करत आहेत. त्यातून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना नाहक त्रास होत असून वर्षानुवर्षे काम करत असलेल्या पत्रकारांची अप्रत्यक्षरीत्या बदनामी होत आहे. अशा गैरप्रकारा विरोधात प्रशासनाने सुमोटो कारवाई करण्याची गरज असून ख-या पत्रकारीतेला जिवंत ठेवण्यासाठी स्वयंघोषित पत्रकारीतेचा बिमोड करणे ही काळाची गरज बनली आहे….

